अजित पवारांना कमी कालावधीतच राजकीय उलटापालतीमुळे खासदार पदाचा राजीनामा द्यावा लागला.
२२ जुलै, १९५९ रोजी प्रभावशाली पवार कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार हे राज्यातील एक प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्व होते आणि या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे अजित पवारांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले.
राजकीय संस्कार लहानपणापासूनच दादांवर होत गेले. काका शरद पवार यांच्या कडून अजित दादांनी राज्यकारभार आणि राजकारणातील बारकावे याचे धडे घेतले. दादांनी १९९१ मध्ये बारामती मतदारसंघातून त्यांची पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय होऊन त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली.
दिवसाचे १६-१७ तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आव्हान लीलया पेलणारे मा. श्री. अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच. सातत्याने गेली ३ दशके महाराष्ट्रासारख्या राज्याच्या राजकीय-सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या नेतृत्वाकडे असलेली सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी थक्क करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेले श्री.अजित पवार नवमहाराष्ट्राचे शिल्पकार आहेत.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘स्वातंत्र्य या सर्वोच्च मूल्याच्या जपणूकीची प्रेरणा या महाराष्ट्राला दिली. शाहू-फुले-आंबेडकरांनी प्रबोधन करुन समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान दिले आणि नवी दिशा दाखवली. साधू-संत, विचारवंत, कवी-लेखक, समाजसुधारक यांनी दाखविलेल्या या वाटेवरून चालताना सोबतीला प्रगतशील तंत्रज्ञानाची, संवेदनशील समाजनिर्मितीची, वैचारिक-आर्थिक समृद्धतेची जोड मिळायला हवी.